एकाच दिवसात 1200 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी… पाहा तुमच्या भागात काल किती नवे रूग्ण

मुंबई |  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली आहे. आज २१२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३२५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४३, ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलढाणा २, नागपूर शहरात २, औरंगाबाद शहरात १, धुळे शहरात १ तर नाशिक शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर ३९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये (७६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १३२५ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २२,७४६  (८००)

ठाणे: २५३ (४)

ठाणे मनपा: १९१६ (३)

नवी मुंबई मनपा: १५०४ (२४)

कल्याण डोंबिवली मनपा: ५५७ (६)

उल्हासनगर मनपा: १०३

भिवंडी निजामपूर मनपा: ५०  (३)

मीरा भाईंदर मनपा: ३३१ (४)

पालघर:६७  (३)

वसई विरार मनपा: ३९६ (११)

रायगड: २६४ (५)

पनवेल मनपा: २४४ (११)

ठाणे मंडळ एकूण:  २८,४३१  (९०४)

 

नाशिक: १०४

नाशिक मनपा: ८२ (२)

मालेगाव मनपा: ६५४ (३४)

अहमदनगर: ४२ (५)

अहमदनगर मनपा: १८

धुळे: १३ (३)

धुळे मनपा: ७१ (६)

जळगाव: २३३  (२९)

जळगाव मनपा: ७० (४)

नंदूरबार: २५ (२)

नाशिक मंडळ एकूण: १३१२ (८५)

 

पुणे: २१२ (५)

पुणे मनपा: ३८४६ (२०२)

पिंपरी चिंचवड मनपा: १८२ (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा:४३०  (२४)

सातारा: १४२ (२)

पुणे मंडळ एकूण: ४८२१  (२३८)

 

कोल्हापूर:६२  (१)

कोल्हापूर मनपा: १९

सांगली: ४७

सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १०२ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: २४८ (५)

 

औरंगाबाद:१६

औरंगाबाद मनपा: १०१२ (३४)

जालना: ३८

हिंगोली: १०७

परभणी: ६ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: ११८१ (३५)

 

लातूर: ४७ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: ११

बीड: ५

नांदेड: ९

नांदेड मनपा: ७० (४)

लातूर मंडळ एकूण: १४५ (६)

 

अकोला: २८ (२)

अकोला मनपा: २५९ (१५)

अमरावती: ७ (२)

अमरावती मनपा:  ११२ (१२)

यवतमाळ: १०१

बुलढाणा:३३ (३)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण:५४३ (३४)

 

नागपूर: २

नागपूर मनपा: ३८६ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ७

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ५

नागपूर मंडळ एकूण:  ४०९ (७)

इतर राज्ये: ४६ (११)

एकूण:  ३७ हजार १३६  (१३२५)

 

महत्वाच्या बातम्या-

-…या स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे?, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला सवाल

-“फडणवीसांचं वागणं म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा”

-“मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, मग कारभार काय फेसबुकवरून चालणार का?”

-निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी… दिली शेंबड्या पोराची उपमा