मुंबई | वर्षा बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या वाक्यांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. वर्षा बंगल्यातील आतील भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युतीबद्दल आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली होती. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा बंगला सोडला तेव्हा भिंतीवर कोणताही मजकूर लिहण्यात आला नव्हता. अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचं हे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी असं कृत्य केलं असावं, असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.
वर्षा बंगल्याच्या भिंतीवर भाजप राॅक्स, देवेंद्र फडणवीस राॅक्स आणि UT वाईट, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यात UT वाईट असं म्हणण्यात आल्याने त्याचा नेमका अर्थ काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेनं यावर सावध पवित्रा घेतला आहे. ते कोण केलं असेल हे लोकांना कळतं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा पुनर्विचार करावा- राजू शेट्टी – https://t.co/lJmH0aGbpW @rajushetti @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 28, 2019
‘सरसकट’ म्हणता मग कर्जमाफीसाठी निकष का लावता?- चंद्रकांत पाटील – https://t.co/jZmfTJX9d0 @ChDadaPatil @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 28, 2019
चंद्रकांत पाटील म्हणतात, माझं उद्धवजींवर प्रेम, पण… – https://t.co/9WPAZcvN7X @OfficeofUT @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 28, 2019