मुंबई | आमच्या कुटुंबात कसलेही वाद नाहीत. पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारचा गृह कलह नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पवार कुटुंबात वाद निर्माण झाल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमात येत होत्या. मात्र आमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा गृह कलह नाही, असं म्हणत अजित पवारांनी या बातम्याचं खंडण केलं.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आला. राजीनामा का दिला? नक्की काय घडलं? हे सांगण्यासाठी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं.
राजीनामा दिल्यानंतर मी शरद पवाराच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माझ्या सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझ्या समर्थकांना आणि पक्षातल्या लोकांना यामुळे त्रास दिला. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवार हे नाव नसतं तर शिखर बँकेचं प्रकरण समोर सुद्धा आलं नसतं- अजित पवार https://t.co/IDrmtQW5ZR @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
“मी शरद पवारांच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही” https://t.co/6iSKeMUFRO @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
…अन् भर पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अश्रुंचा बांध फुटला! https://t.co/WTZLgYp3DG @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019