बारामती | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शुक्रवारी ते पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनंतर आमदार रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी बारामतीकरांनी जीवाचं रान केलं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मिरवणुकीनंतर ते आपल्या भाषणात बोलत होते.
बारामतीकरांनी इतर जागा निवडून आणण्यासाठीही प्रचंड संघर्ष केला. कर्जत-जामखेडमध्येही रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या कष्टाचा उतराई मी कधीच होऊ शकणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, जर बोलण्यातून लोक निवडून आले असते तर मनसेचे 20 ते 25 लोक निवडून आले असते, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून भाजप-मनसे युती होऊ शकत नाही” – https://t.co/27q6KaayiS @RamdasAthawale @BJP4Maharashtra @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020
“उतू नका, मातू नका गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस, त्यांचा सत्तेचा माज बारामतीकरांनी उतरवला” – https://t.co/chcx9ykvlw @amolmitkari22 @NCPspeaks @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020
चहा शरीराला तर चहावाला देशाला घातक; राष्ट्रवादीच्या नेत्याची पंतप्रधानांवर टीका – https://t.co/CidLStZOB8 @amolmitkari22 @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4India @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020