“…म्हणून भाजप-मनसे युती होऊ शकत नाही”

मुंबई | राज ठाकरे भाजपसोबत येणं हे भाजपसाठी फायद्याचं ठरणार नाही आणि जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यात त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती होऊ शकत नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामदास आठवले यांनी संभाव्य भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं  आहे.

शिवसेना जरी आज भाजपसोबत नसेल तरी आरपीआय मात्र भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांसोबत ताकदिने उभी आहे. दलितांची मतं मिळवण्यासाठी आरपीआयचं भाजपला समर्थन आहे. त्यामुळे राज ठाकरेची काही गरज नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-