कलम 370 वेगळी गोष्ट होती….. कलम 371 ला आम्ही हात लावणार नाही- अमित शहा

गुहावटी | 370 ही बाब वेगळी बाब होती परंतू ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या 371 व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. आम्ही कलम 371 ला हात लावणार नाही, असं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.

नुकतीच आसाममध्ये एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आसामचा दौऱ्यावर होते.

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम 370 मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम 370 आणि कलम 371 या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचं अमित शहा म्हणाले.

कलम 370 हटवल्यानंतर कलम 371 सुद्धा हटणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र कलम 371 आम्ही हटवणार नसल्याचं शहा म्हणाले आहेत.

दरम्यान,26 जानेवारी 1950 रोजी ईशान्येकडील राज्यांमध्ये कलम 371 लागू करण्यात आले. ईशान्येकडील 6 राज्यांसह देशातील 11 राज्यांमध्ये हे कलम लागू आहे.

महत्वाच्या बातम्या-