काँग्रेस धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे- अमित शहा

नवी दिल्ली | सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे भारतीय नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे.

सीएए विरोधात असलेले दलित-विरोधी असल्याचं अमित शहांनी म्हटलं  आहे. तसेच मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल असा कोणताही कलम या कायद्यामध्ये नाही. राहुल गांधी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी सीएए पूर्णपणे वाचावा, भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेण्याबाबत त्यामध्ये काही आढळलं तर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी त्याबाबत अपल्याशी वादविवाद करण्यास तयार आहेत, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस धर्मांच्या नावावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमित शहांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

…अन् केंद्र सरकार सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालंय- प्रकाश आंबेडकर

सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठीच मी नवीन पक्षाची स्थापना करणार आहे- सदाभाऊ खोत

मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे, त्यांचे विचार माझ्या नसानसात आहेत- संजय राऊत

कसं का होईना झालो ना चार वेळा उपमुख्यमंत्री- अजित पवार

सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचं युद्ध नाही- संजय राऊत