अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

पुणे | उभ्या महाराष्ट्रात चर्चिला गेलेला सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंनी सामोपचारानं माघार घेत परस्पर सहमतीनं या वादावर पडदा टाकला.

शिवजन्मभूमीची बदनामी नको, या एकाच कारणामुळे हा वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये शिरोली बुद्रुक गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला आणि बैठक घेऊन हा वाद गावातल्या गावात निकाली काढला. अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

अखेर टोळधाड उघडी पडली. राष्ट्रवादीचे जुन्नर चे आमदार, आमचे बंधू अतुलशेठ बेनके यांनी भक्तांची धारण चांगलीच पाचावर बसवली. विरोधकांनी एक कायम लक्षात ठेवावं इथे नमो भक्त नाहीत इथे राष्ट्रवादी आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

तुम्ही कशीही चाल खेळलात तरी डाव जिंकणारे योद्धे इकडेच आहेत. शेवटी अख्या टोळधाडी वर अतुलशेठ यांनी फवारणी करून ट्रोल करणारे उघडे नागडे केलेत एक खंत कायम मनात राहील ती म्हणजे या सर्व प्रकारात खासदार डॉ. अमोल कोल्हे सारख्या प्रामाणिक व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

-फक्त ‘या’ एका कारणामुळे अक्षय बोऱ्हाडे-सत्यशील शेरकर यांच्यातील वाद मिटला

-अखेर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

-“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

-‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण