मुंबई | अमृता फडणवीस या स्वतंत्र आहेत. त्यांमुळे त्यांचे निर्णय त्या स्वत: घेतात. त्या माझं ऐकत नाहीत. अमृता कधीही कोणत्या गोष्टीसाठी थांबत नाहीत, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
फडणवीस यांनी एबीपी माझा या वृतवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस या स्वतंत्र विचाराच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे ते त्यांचे निर्णय स्वत: घेतात व मीही त्यात लुडबूड करत नाही, असं ते म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकावरुन अमृता यांनी ट्विट केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमृता या वेगळी एन्टीटी आहेत. त्या मला विचारुन ट्विट करत नाहीत आणि मी सांगितल्याने त्या थांबत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मागच्या काही वर्षात अमृतावर खालच्या दर्जाची टीका करण्यात आली. ते आम्ही सहन केलं. राजकीय जिवनात हे सहन करावं लागतं, असंही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आपण मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या”; भगवानगडावरून मुडेंना निमंत्रण – https://t.co/ZplhG7amPY @dhananjay_munde @NCPspeaks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार असतील तर त्यांचं स्वागतच- सुनिल तटकरे – https://t.co/HDKXf821IU @SunilTatkare @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला लाखो रूपयांचा बोनस; आकडा ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित https://t.co/YEmT8ALe4u #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 13, 2019