मुंबई | सत्तेवरून पायउत्तार झाल्यानंतर भाजपचे नेते महाविकासआघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ट्वीटरवर सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी आगामी अधिवेशनावरून सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला आहे.
आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत. कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते, अशी जोरदार टीका करत नवाब मलिक यांनी राम कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) 30 दिवस आधी देणे अपेक्षित असते. सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली.
सरकारच्या कामाची अजब पद्धत आहे. हिवाळी अधिवेशनात आमदाराना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असून प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, अशी टीका राम कदम यांनी केली होती.
विरोधात असताना डोळे मिटलेल्यांचे सत्तेत आल्यावर डोळे उघडले हे काय कमी आहे? आता डोळे उघडले असतील तर नियम वाचून बोला. https://t.co/5yQm7mAukP pic.twitter.com/EVt7cr95wm
— Ram Kadam (@ramkadam) December 13, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता स्वत: निर्णय घेतात त्या माझं ऐकत नाहीत- देवेंद्र फडणवीस – https://t.co/PPBRhQUhpC @fadnavis_amruta @Dev_Fadnavis #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
“आपण मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या”; भगवानगडावरून मुडेंना निमंत्रण – https://t.co/ZplhG7amPY @dhananjay_munde @NCPspeaks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार असतील तर त्यांचं स्वागतच- सुनिल तटकरे – https://t.co/HDKXf821IU @SunilTatkare @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019