मी पुन्हा येईन…!; अमृता फडणवीसांचा एल्गार 

मुंबई | बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी ट्विटरवर शायरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे !, गेल्या 5 वर्षात वहिनी म्हणून महाराष्ट्राने जो आदर दिला. तुम्ही जे प्रेम केलत त्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी या ट्विटला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस सक्रीय राजकारणात नसूनही त्या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.

 

अमृता फडणवीस यांचं ट्वीट-

 

महत्वाच्या बातम्या-