“फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला, अशी टीका अनिल गोटेंनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी हजारो कोंटींचे घोटाळे केले आहेत, असा आरोप अनिल गोटेंनी केला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं, अशी बोचरी टीका अनिल गोटेंनी केली आहे.

मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही. फडणवीसांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत, असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे असं सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-