“पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोपर्यंत…”, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

डेहराडून | गेल्या 8 वर्षात काँग्रेसला महागळती लागल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तर अनेक राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

अशातच आता काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीला सुरूवात झाल्याने काँग्रेस नेत्यांनी खुलेआम पक्ष नेतृत्वावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

उत्तराखंडचे कृषिमंत्री गणेश जोशी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही. जोवर पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोपर्यंत काँग्रेस संपत राहणार, असं वादग्रस्त वक्तव्य गणेश जोशी यांनी केलं आहे.

लोकांचा भाजपवरील विश्वास सातत्यानं वाढताना दिसत आहे. कारण भाजप जे बोलतो ते करून दाखवतो, असंही जोशी म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेत्यांनी ऑफर देखील दिली आहे.

काँग्रेस नेेते मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये येत आहेत. त्यांना भाजपमध्ये योग्य सन्मान दिला जातो. तर काहींना मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात आलंय, असंही गणेश जोशी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेन्शन वाढलं! चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

‘…अन् पवारांची जादू चालली’, गुलाबराव पाटलांनी सांगितला पहाटेच्या शपथविधीचा किस्सा!

आरामदायी Marutiची नवी 7 सीटर कार लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…