मुंबई | पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांनतर लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. घाणेरड्या भाषेत बोलायला मी संजय राऊत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी भाजपवर टीका केली होती. भाजपचे नेते माझ्यावर कितीही घाणेरड्या शब्दांत टिका करु दे, मी त्यांना प्रत्युत्तर देईन, असं ते म्हणाले होते. यावरुन आशिष शेलारांनी राऊतांना टोला लगावला आहे.
अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा शेवटचा डाव होता. तो भाजपवर उलटला आहे. भाजपला आता शेवटाकडे जात आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर टीका केली होती.
दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी शक्यता बळावली असतानाच राजकारणाला कलाटणी मिळाली. अजित पवारांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार तिथं पोहोचले भाजपचे ‘हे’ आमदार; चर्चांना उधाण! https://t.co/kLjXcGYqSc @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019
देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी वैध की अवैध?; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला https://t.co/DXQBvE4cCJ #MaharashtraPolitics
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019
अजित पवार रात्री उशिरा पडले घराबाहेर; चर्चांना उधाण https://t.co/nCTWMPPo5j @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019