ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार तिथं पोहोचले भाजपचे ‘हे’ आमदार; चर्चांना उधाण!

मुंबई | शनिवारी घडलेल्या भूकंपानंतर राष्ट्रवादीने आपले आमदार फुटू नयेत म्हणून खबरदारी घेतलेली आहे. आपल्या आमदारांना त्यांनी मुंबईतल्या पवईच्या हॉटेल रेनिसान्स येथे ठेवलं आहे. मात्र आता भाजपने नवी चाल खेळली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण भाजप आमदार रविंद्र चव्हाण त्या हॉटेलमध्ये पोहचले आहेत.

रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत. ते फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं रेनिसान्स हॉटेलमध्ये जाणं त्या अर्थाने खूप महत्त्वाचं आणि सूचक मानलं जातंय. मात्र त्यांचं रेनिसान्समध्ये जाण्याचं कारण आणखी समोर येऊ शकलं नाही.

राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार फुटणार नाहीत. विश्वासदर्शक ठरावात आम्ही नक्कीच भाजपला पराभूत करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नवी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर आता काही क्षणांत सुनावणी होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-