मुंबई | मुंबईकरांनी आता फक्त काय बालहट्टच पुरवायचे का? असा सवाल करत आदित्यसाहेब, आता फक्त म्हातारीच्या बुटाचा हट्ट करू नका म्हणजे मिळवलं, असा जोरदार टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदिच्य ठाकरे यांना लगावला आहे.
समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही, या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेलार यांनी आक्षेप घेत ट्वीट करून आदित्य यांना लक्ष्य केलं आहे. पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला, असं म्हणत त्यांनी मुंबईच्या नाईटवरूनही आदित्य यांच्यावर टीका केली आहे.
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!, असं ट्वीट शेलार यांनी केलं आहे.
मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील जागाच योग्य असल्याचा अहवाल 4 सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने दिला होता. त्यावर समितीचा हा निर्णय बंधनकारक नसल्याची प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर शएलार यांनी ट्वीट करून टीकास्त्र सोडलं आहे.
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-मी तर माझी बॅग पॅक करून ठेवली होती पण…..- रोहित शर्मा
-मशिदींना हात लावल्यास मी मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील- आठवले
-“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”
-….याप्रकरणी भाजप राधाकृष्ण विखे पाटलांची चौकशी करणार!
-रोहित शर्माच्या मॅचविनिंग खेळीला दिग्गज क्रिकेटपटूंचा सॅल्यूट!