‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

मुंबई | तरुणांचं भविष्य वाचवण्यासाठी सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी भयभीत आहेतच शिवाय नोकरी धंदा जाईल म्हणून पालकांचा जीवही धोक्यात आला आहे. त्यात सरकारचा गोंधळात गोंधळ. दुर्दैवाने विद्यार्थी तणावात आहेत. तर उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ?, अशी टीका शेलारांनी सरकारवर केली आहे..

पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40% म्हणजे ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचं हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र?, असं म्हणत शेलारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

-सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

-लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे

-“कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा”

-आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय