गेल्या 20 दिवसांत चौथ्यांदा आशिष शेलार राजदरबारी भेटीसाठी पोहोचले!

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतंय. गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर पोहोचले.

मनसे-भाजप जवळीक वाढत असताना राज ठाकरे-शेलार यांच्यात बैठकांचे सत्र सुरु आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अनेकदा चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.

आशिष शेलार यांनी यापूर्वी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच काळ चर्चा झाली होती.

दरम्यान, मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे-एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणातात…

“पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत”

विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं!

वंचितला मोठा धक्का; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…