उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न येता मक्केला जावं; अयोध्येतील साधूंची टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. ते अयोध्येला जाण्यापूर्वीच राजकारण सुरु झालं आहे. भाजपने त्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली असतानाच काही साधूंनी त्यांना विरोध केला आहे.

तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव यांनी अयोध्येऐवजी मक्केला जावं असा घणाघात त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः अडवणार असल्याचं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चीला जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत रामभक्तांना धोका दिल्याचा आरोपही महंत परमहंस दास यांनी केला आहे. तसेच रामभक्तांना धोका देणाऱ्यांना रामाचे दर्शन घेण्याचा काय अधिकार? असा सवाल त्यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त लोकमतनं दिलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे 8 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-इटलीहून परतलेल्या राहूल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजप नेत्याचा सवाल

-“ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवायच राष्ट्रवादी निर्णय घेते?”

-केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलंय- उद्धव ठाकरे

-सोलापूरच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!; खासदारकी जाणार?

-बच्चू कडूंनी शेअर केला कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ