दुसऱ्या टप्यात होणार दोन लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी- बच्चू कडू

नागपूर |  मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असं मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बर्‍याच अडचणी आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याचंही कडू यांनी म्हटलं आहे.

दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असंही कडूंनी आपल्या कडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान,  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“ठाकरे सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा खोटी”

-तावरे गुरु-शिष्याचा पराभव करत अजित पवारांनी माळेगावचा गड आणला खेचून

-सर्वांच लक्ष वेधून घेणारी ट्रम्प यांच्यासोबत असणारी ‘ती’ महिला नक्की आहे तरी कोण?

-अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

-CAA वरुन राजधानी पेटली; पोलिसासह 5 जणांनी जीव गमावला