भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे करंजी भोगे येथे आले. त्यानंतर गोडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला

गोडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

शिरीष गोडे यांनी 2008 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपत प्रवेश केला होता. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

गोडे हे दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. आताही त्यांच्याकडे भाजपचं जिल्हाध्यक्षपद होतं. भाजपची ध्येयधोरणं बदलली, पक्षाच्या आणि नेत्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. जुना पक्ष राहिला नाही.

दरम्यान, सहा महिन्यापासून व्यथित होतो वरिष्ठांना माहिती दिली पण कारवाई केली नाही. जनतेविरोधी, शेतकरी विरोधी धोरण राबवली जात आहेत, असं सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपमध्ये शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याला कंटाळून राजीनामा दिल्याचं डॉक्टर शिरीष गोडे यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा- शरद पवार  

बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा- उदयनराजे भोसले 

“शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण…” 

थंडीतही पाऊस; पुढील चार दिवस ‘या’ भागात कोसळणार पाऊस 

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर