कोरोना कधी संपणार?; WHO प्रमुखांनी अखेर सांगितलं

नवी दिल्ली | जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम यांनी म्युनिकमधील एका सुरक्षा संमेलनात कोरोनाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आज परिस्थिती कोरोना विषाणूच्या आणखी धोकादायक व्हेरिएंटसाठी आदर्शवत बनली आहे. पण कोरोना महामारीचा शेवट तेव्हाच होईल, जेव्हा आपल्याला या संकटाचा खात्मा करायचा असेल, असं डॉ. टेड्रोस यांनी म्हटलं आहे. संपूर्ण जगाला केवळ महामारीचा खात्मा करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं.

दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीला सुरुवात झाली. त्यावेळी आपण या विषाणूच्या प्रसारानं चिंतेत होतो. आता आपण महामारीच्या तिसऱ्या वर्षात आहोत, असंही ते म्हणालेत.

सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचे अधिक संक्रामक व्हेरिएंट तयार होऊ शकतात. मात्र आपण याच वर्षी महामारीचा खात्मा करू शकतो, असं डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं.

काही देशांमध्ये लसीकरण चांगलं झालंय, तिथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका कमी झाला आहे. आता कोरोना संपला अशी तिथल्या लोकांची मानसिकता झालीय. पण तसं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम आहे.

महत्वाच्या बातम्या- 

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका

“पहाटे 5 वाजता ही मी काम करायला तयार आहे, पण अंधार असतो ना” 

“एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक त्याचं श्रेय घेतात” 

“सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही, सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारणार?”

‘राजकारणात जो आपला विरोध करतो तो ही उद्या…’; राज्यपालांचं मोठं वक्तव्य