भोपाळ | माझ्या घरात कामासाठी आलेल्या बांधकाम कामगारांना मी भरपूर पोहे खाताना बघितले. ते पोळी खात नाहीत त्यामुळे ते बांगलादेशीच असावेत, असं अजब तर्क भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी लावला आहे. नागरिकत्व कायदा समर्थन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी लावलेल्या या तर्कामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माझ्या घरात काम करणारे पोळी नव्हते पण भरपूर पोहे खात होते, असा निष्कर्ष विजयवर्गीयांनी काढल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरुन विजयवर्गीय यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देत आपल्या वक्तव्याची सारवासारव केली आहे.
ते लोक पोळी खात नाहीत, ते हिंदी बोलत नाहीत त्यांना हिंदूी समजत नाही. ते कुठल्या जिल्ह्यातील आहेत हेही सांगू शकत त्यांनी ते सांगितलं तर मी समजू शकलो असतो कारण मला पश्चिम बंगालची बारीक माहिती आहे, पण त्या कामगारांना अशी माहिती नव्हती, असं म्हणत विजयवर्गीयांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव केली आहे.
दरम्यान, मी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला आहे. शरणागती आणि घुसखोर यांच्यातील भेद दाखवण्यासाठी आपण जी उदाहरणे दिली त्यांचा हा चुकीचा अर्थ लावला गेल्याचंही विजयवर्गीय यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सेना-भाजपद्वेषाचं मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे” – https://t.co/2jYFddLSSk @ShivSena @OfficeofUT @mnsadhikrut @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RajThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 25, 2020
“राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात”- https://t.co/AQjvsFDs86 @RajThackeray @mnsadhikrut @ShivSena @rautsanjay61
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 25, 2020
हिंदुत्व पेलणं येरागबाळ्याचा खेळ नाही; राऊतांचा मनसेला टोला – https://t.co/bAoCLjfZoK @rautsanjay61 @mnsadhikrut @ShivSena @RajThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 25, 2020