नागपूर | हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यांवरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाचा तिसरा दिवसही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. अशातच अधिवेशन सुरु होण्याअगोदर भाजप आमदारांनी केलेल्या घोषणा चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानभवनाबाहेर भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’, अशा घोषणा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिल्या. यावर ’25 हजाराला नाही म्हणतो’ असं म्हणत भाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
हेक्टरी 25 हजारांची मदत शेतकऱ्यांना झालीच पाहिजे. दिलेला शब्द पाळा, अशा मागण्या भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केल्या. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवसही रंगणार आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहात भाजप-शिवसेना आमदारांची धक्काबुक्की झाली होती. तसेच ‘सामना’चे पोस्टर दाखवल भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता.
महत्वाच्या बातम्या-
अमित शहांच्या नादाला लागू नको म्हणणाऱ्यांना अनुराग कश्यपचं सडेतोड उत्तर – https://t.co/JgqWZ9b1p8 @anuragkashyap72 @AmitShah @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019
आमदाराच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळात पहिलं उत्तर – https://t.co/SZmVb7nH5B @uddhavthackeray @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019
स्थानिक निवडणुकीतही महाविकास आघाडीनं एकत्र लढायला हवं- शरद पवार – https://t.co/aUFepYqVp8 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019