नवी दिल्ली | बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारनं गृहमंत्री अमित शहा यांना आरोग्याशी निगडीत एक सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यानं हा सल्ला दिला. यावेळी अँकरनं अक्षयला अमित शहा यांना तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतोस असं सांगितलं. यावर अक्षयनं खूप विचार केला. पण त्याच्या मनात कोणताही विचार आला नाही. मात्र अक्षयनं एक सल्ला दिला आहे.
अमित शहा यांनी सायंकाळी 6:30 नंतर शक्यतो काहीही खाऊ नये. आपल्या शास्त्रातही सूर्यास्तानंतर काहीही न खाण्याबद्दल सांगितलं आहे, असा सल्ला अक्षय कुमारनं शहा यांना दिला आहे.
देशासाठी शहा अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती असल्यामुळेे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं त्यांनी सायंकाळी 6:30 नंतर खाऊ नये आणि फिट राहण्यासाठी हे चांगलंही असतं, असंही अक्षय कुमारनं म्हटलं आहे.
एकवेळ अशी होती की, माझे सलग 14 सिनेमे आपटले होते. यानंतर मी कॅनडामध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला होता. माझा मित्र तिथे रहायचा. मी त्याला फोन केला आणि कॅनडाचा पासपोर्ट घेतला. त्यानंतर माझा 15 वा सिनेमा हिट झाला, असं अक्षय नागरिकतेच्या मुद्यावर बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या-
‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’; भाजप आमदार म्हणाले… – https://t.co/esdRyk68RQ @SoniaGandhi_FC @ShelarAshish @ShivSena @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019
“नागरिकत्व सुधारणा कायदा माझ्या जातीविरुद्ध, माझी जात वंजारी” – https://t.co/Vzy32FyJmm @Awhadspeaks @NCPspeaks @BJP4India #NRC #CAB_FactsVsDistortion
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019
मोदी सरकारला मोठा दिलासा, सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार! – https://t.co/xdSdx0ucqV @narendramodi @AmitShah @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 18, 2019