“आगामी निवडणुकांसाठी हे भाजपचं षडयंत्र, महाराष्ट्रातील जनतेने त्याला बळी पडू नये”

मुंबई | त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात दिसून येत आहेत. अमरावतीत भाजप आणि समविचारी संघटनांनी बंद पुकारला होता. त्यानंतर आता या बंदला हिंसक वळण लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव असल्यीची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असंही आवाहन नाना पटोले यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसात अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध देखील नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही, असंही नाना म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भाजपविरोधात तीव्र असंतोष आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणं हा भाजपचा इतिहास राहिलाय, अशी घणाघती टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.

या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडे नये, राज्यात शांतता राखावी, असं आवाहन देखील नाना पटोले यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमरावतीत कलम 144 लागू; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उचललं मोठं पाऊल

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”

  “महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”