नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी (एनआरसी) या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला होता. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाॅक्सर विजेंदर सिंह याने यावरुन भाजपवर टीका केली आहे.
हे लोक संपू्र्ण देशाला गुजरात बनवून टाकतील. अजूनही वेळ गेलेली नाही, असं म्हणत विजेंदरने दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे. विजेंदरने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
विजेंदरने सिंहने वारंवार भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. त्याने यापूर्वीही ट्विट करत भाजपच्या कारभारावर टीका केली आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
दरम्यान, अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी विजेंदरच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तुम्हाला बाॅक्सिंग आणि वायफळ बडबड यातील फरक समजायला हवा, असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पूरे देश को गुजरात बना देंगे अब भी टाइम है
— Vijender Singh (@boxervijender) February 27, 2020
बॉक्सिंग तों आती है sir बकवास आजकल 2 लोगो से सिख रहा हूँ #Respect https://t.co/v5D6vhLkIT
— Vijender Singh (@boxervijender) February 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-हो खरंच… नाथाभाऊंच्या तोंडी फडणवीसांची स्तुती!
-मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची निवड
-दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत ‘चेकमेट’ करण्याची खेळी?
-सुप्रिया सुळेेंच कौतुक करताना नाथाभाऊ म्हणतात…
-कोरोना पसरतोय जगभरात; महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु अडकले इराणमध्ये