मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी मुंबईतील 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला होता.
अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीसांना धारेवर धरलं. त्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्या या वक्त्यावरून खोचक टोला लगावला होता.
मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर आता चित्रा वाघ कडाडल्या आहेत. ट्विट करत चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सो़डलं आहे.
आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विनप्रेमामुळे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशाचा हिशोब द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
राठोड राऊत परब सारख्या पात्रामुळे शिवसेना ‘हास्य जत्रा’ बनलीये. कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही..‘चला.. हवा येऊ द्या..’, असंही वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याने आता हे प्रकरण आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा भीषण अपघात, कार उद्ध्वस्त
ना विराट ना माॅरिस, ‘हा’ ठरलाय IPL सामन्यातील सर्वात महागडा खेळाडू
“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ
आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर