“…तसं आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

पुणे | ज्याचा हातामध्ये वाढणं असतं, तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो तसं आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत त्यामुळे मुंबईमधील 8 हजार कोटींची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दिली आहे. 8 आणि 9 हजार कोटीमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो. त्यात टँकर, गुरांच्या छावण्या, नुकसान भरपाई द्यायची असते, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

केवळ घोषणा करायच्या लोकांना दाखवायचं की आम्ही हे केलं ते केलं आहे. साधारण 93 तासाचं अधिवेशन आणि त्यात मुलभूत प्रश्नांना हात न घालता आपल्या राजकीय सोयी ज्या आहेत त्या पटापट करून घेणं असं हे अधिवेशन झालं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही कोणताही शोध लावत नसून प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. मात्र हे मी वारंवार म्हटलंय आज पुन्हा म्हणेल हे सरकार आम्ही पाडणार नाही आणि आम्ही ज्योतिरादित्य शिंदेही शोधणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता- नितीन राऊत

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला”

मध्यप्रदेशमध्ये कोणाचं सरकार, 16 मार्चला फैसला

जैन समाजाचं कौतुकास्पद पाऊल.. महावीर जयंतीचा कार्यक्रम रदद् करून कोरोनाच्या उपचारासाठी निधी

कोरोनामुळे होतायेत पाळीव प्राणी बेघर