फडणवीसांच्या परभणीतील सभेत गोंधळ; उपस्थित म्हणाले पीक विमा आणि कर्जमाफीवर बोला…

परभणी |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण 5 वर्षांत काय काय विकास केला? हे सांगण्यासाठी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज परभणीत त्यांची सभा होती. मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी एकच गोंधळ घातला आणि जरा पीक विमा आणि कर्जमाफीवर बोला, असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.

5 वर्षांच्या सत्ताकाळात आपण राज्यात कोणते प्रगतीशील कामं केली हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा सुरू आहे, असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेला पीक विमा आणि कर्जमाफीसारख्या महत्वाच्या मुद्दयावर मुख्यमंत्री बोलत नव्हते. आज याच विषयीच्या शेतकऱ्यांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सोमोरं जावं लागलं.

राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सरकारने कर्जमाफी केली खरी पण त्याचा आम्हाला लाभच झाला नाही. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलायला हवं होतं, असं तेथील उपस्थितांचं म्हणणं होतं.

दरम्यान, राज्यात महाजनादेश यात्रेला जोरदार प्रतिसाद भेटतो आहे मात्र परभणीत शेतकऱ्यांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-