चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | बॉलिवूडला गेल्या 24 तासांत सलग मोठा दुसरा धक्का बसला आहे. इरफान खान यांना जाऊन काही तास होत नाहीयेत तोपर्यंत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांना आदरांजली अर्पण केली आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला हे दु:ख पचवणं मोठं कठीण झालं आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे

ऋषी कपूर चित्रपट सृष्टीतील २ पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक व चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. ते सहज सूंदर अभिनेते व तितकेच परखड,प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, कलाक्षेत्रातल्या दिग्गजांनी देखील ऋषी कपूर यांना आदरांजली अर्पण केली आहे. महानायक अमिताभ बच्चन, शाहरूख खान, रणबीर, दिपीका, प्रियांका यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली- छगन भुजबळ

-“मरणाच्या उंबरठ्यावर असतानाही डॉक्टर, नर्सेस यांना हसवलं”

-लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार

-“शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य”

-ऋषी कपूर यांच्या अखेरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी उडवली होती टीकेची झोड; पाहा काय होतं ‘ते’ ट्विट