“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”

मुंबई | लॉकडाऊन जर असाच सुरू ठेवला तर दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची हालत बिकट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘सकाळ’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊ शिथील करण्याबाबत अनेक मतं-मतांतर आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला लॉकडाऊन शिथील करण्याची वेळ आली आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडीला हिंमत दाखवून लॉकडाऊन शिथील करावा लागेल नाहीतर राज्याची अर्थव्यवस्था ढेपाळायला वेळ लागणार, असं फडणवीस म्हणाले.

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. कोरोनाच्या भीतीने बचावात्मक पवित्रा घेतला तर राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन शिथील करावा, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे- एकनाथ खडसे

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार

-आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी