सोलापूर | विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत, असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातल्या चार जागा मागणार असल्याचं सांगत या जागांवर तयारी करण्याचे आदेश जानकरांनी दिले आहेत.
भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटपमध्ये सरकार सोबत असलेल्या शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी 18 जागा देण्याचं ठरलं असल्याचं जानकर यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले माझे कायमच मोठे भाऊ राहिले आहेत. तरी राज्यात रासपची वाढलेली सत्तेतील भागीदारी जिल्हा परिषद ,पंचायत समित्या, नगरपरिषद यामध्ये वाढलेल्या बळामुळे 18मधल्या दहा ते बारा जागा लढवणार, असं जानकर यांनी सांगितलं आहे.
रासपची शक्ती वाढल्यामुळे घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ आपण असणार आहे, असे संकेतही जानकर यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास आठवले यांचं मोठं भाकीत; म्हणतात…- https://t.co/1agh1nceCj
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का?- इम्तियाज जलील- https://t.co/yEZUaVsrmd #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
…..तोपर्यंत आरक्षण सुरू ठेवायला पाहिजे- आरएसएस https://t.co/XJPSvXOiH9 @RSSorg
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019