मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील. परिणामी मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहील आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल, असं भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे.
जागावाटपाच्यावेळी अडीचअडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. ज्याच्या जास्त जागा येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल. भाजपच्याच जास्त जागा येतील, असा आमचा अंदाज आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, आमच्या पक्षात सध्या कुठलेही मोठे नेते नाहीत. पण एकदा आमच्या पाच ते सहा जागा निवडून आल्या की पुढच्या वेळी आमच्याही पक्षात इनकमिंग होईल, असं आठवले यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का?- इम्तियाज जलील- https://t.co/yEZUaVsrmd #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
…..तोपर्यंत आरक्षण सुरू ठेवायला पाहिजे- आरएसएस https://t.co/XJPSvXOiH9 @RSSorg
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
घुसखोरांना आम्ही हाकलणारच; ज्यांना मांडीवर घेऊन बसायचंय त्यांनी बसावं- उद्धव ठाकरे https://t.co/0iKSjDre9j@uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019