रयतेला अंधारात टाकणारा राजा पुन्हा होणे नाही!; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : महाजनादेश यात्रेत रथासाठी वीजेच्या तारा तोडत रयतेला अंधारात टाकणारा राजा पुन्हा होणे नाही, अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

वीजचोरी, मार्गातील झाडांच्या फांद्या तोडणे, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड, मुस्कटदाबी करणाऱ्या मुख्यमंत्री हुकूमशाही, दडपशाही थांबवावी. ही लोकशाही आहे, असेही मुंडे म्हणाले. 

बोलबच्चन मुख्यमंत्र्यांना परभणीकरांनी गप्पच बसवले. राज्याचे ‘अभ्यासू’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तूमच्यात आहे का हिम्मत परभणीकरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची? कुठे गेली तुमची पीक विम्याची योजना, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले? असेल हिम्मत तर सांगा खरे आकडे, असं म्हणत मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला आहे.

जालन्यातील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्याला संतप्त जमावाने कोळे झेंडे दाखवले होते. याचा व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्ताच्या बातम्या-