मुंबई | राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण जोरदार पेटलं आहे. यावरुन राजकीय नेत्यांचा आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुराही पहायला मिळाला.
अद्यापही भोंग्याचा मुद्दा सुरु असून टीकांची झोप चालूच आहे. अशातच आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी यावरुन प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. पण भोंग्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या वादाचा त्रास हा सर्वात खालच्या स्तरातील लोकांना होणार आहे, असा हल्लाबोल दिपाली सय्यद यांनी केला आहे.
दिपाली सय्यद यांनी नाव न घेता अमृता फडणवीसांवरही टीकेचा घणाघात केला आहे. फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे स्वप्नच राहील.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त न्यू कामगार संघटनेच्या वतीनं कल्याणमध्ये आयोजित बाईक रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमात दिपाली सय्यद बोलत होत्या.
दरम्यान, राज्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार असून राज्यात जोरदार गदारेळ पहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राज ठाकरे हे भाजपचे पपेट आहेत”; धनंजय मुंडेंचा घणाघात
“ईडीची पीडा टाळण्यासाठी राज ठाकरेंची आजची सभा”
Health| उन्हाळ्यात जास्त पाणी पिणेही ठरु शकतं घातक?, वाचा सविस्तर
“बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी….”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मास्क सक्तीविषयी राजेश टोपेंचा गंभीर इशारा, म्हणाले…