‘सुशांतसारखं कार्तिकलाही फासावर जाण्यास भाग पाडू नका…’, कंगनाचा करण जौहरवर निशाणा

मुंबई| निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने 2019 मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना 2’चा भाग असणार नाहीये. अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मोठा वाद झाल्याची घटना समोर येत आहे.

‘दोस्ताना 2’ या फिल्ममधून अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेर केल्यानं करण जोहरवर पुन्हा एकदा प्रेक्षक संतापलेले आहेत. सोशल मीडियावर करण जोहरला नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे. अशातच बॉलिवूड क्विन कंगना रणौतनं हिने या वादात उडी घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शन्सच्या बहुचर्चित ‘दोस्ताना-2’ मधून वगळण्यात आल्याची बातमी समोर आली त्यानंतर काल ट्विटरवर कार्तिक आर्यनच्या बाजूने लाखो ट्विट करण्यात आले. यातच बाॅलिबूड अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत दिग्दर्शक करण जोहरवर कडक शब्दात हल्ला चढवला आहे.

याबाबत कंगनानं एका मागोमाग एक बरेच ट्वीट्स केले आहेत. कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर या ठिकाणी पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वतःच्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त ‘पापा जो’ आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटं सोडा. सुशांतसिंह राजपूतसारखं आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटं सोडा.’

कंगनानं तिच्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘कार्तिक आर्यन या चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. वाईट आर्टिकल लिहून आणि घोषणा करून हे लोक फक्त तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग यासाठी तुलाच जबाबदार ठरवून स्वतः मौन राहतील. त्यांनी सुशांतसिंह राजपूतचं ड्रग्सचं व्यसन आणि वाईट व्यवहाराची कथा अशीच पसरवली होती.’

पुढच्या ट्वीटमध्ये कंगना म्हणाली, कार्तिकने या चिल्लरांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. घाणेरडे लेख लिहून आणि घोषणा देवून केवळ मनोबल खच्चीकरण करण्याचे काम चाललं असून त्याबाबत मौन पाळायचं नाटक यांनी लावलंय. या लोकांनी यापूर्वी सुशांतसाठी तो अमली पदार्थांमध्ये कसा गुरफटला आहे आणि त्याच्या व्यसनाधीनतेची कथा रचली होती, असा आरोप देखील कंगणाने केला आहे.

कंगना रनौत आणि करण जोहर यांच्यातील वाद अत्यंत जूना आहे. या दोघांनी अनेकदा एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तर कंगनाने करण जोहरवर निशाणा साधला होता.

दरम्यान, करणने कार्तिक आर्यनला आगामी सिनेमा ‘दोस्ताना 2’ मधून डच्चू दिला आहे. यावरच करण थांबला नाही तर यापुढेही धर्मा प्रॉडक्शन आणि त्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमात कार्तिकला सहभागी न करण्याची शथपही घेतली आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या – 

‘तो’ फोटो शेअर करत कंगना रणौतनं महाराष्ट्रातील…

फक्त 10 मिनिटं भेटशील का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

सिनेसृष्टीला मोठा धक्का: प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या…

फँड्रीतील शालूचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर…

आता हेच ऐकायचं राहिलं होतं! ‘सरकारने सर्वात आधी…