‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू!

मुंबई | अभिनेते ज्ञानेश माने ( Dnyanesh Mane) यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.

घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीच्या काळात मानेंवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्ञानेश यांनी ‘लागिरं झालं जी’ मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा मुख्य अभिनेता नितीश चव्हाण याच्यासोबत लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

ज्ञानेश मानेंच्या आकस्मिक निधनाचे वृत्त आल्यानंतर नितीश चव्हाण याच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

लागिरं झालं जी या मालिकेत ज्ञानेश माने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सोलापूर गँगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबरडा, यादया यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ते मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती, जरडगावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला 

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती