आज सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत दर

नवी दल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भाव देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

मात्र अलिकडे काही दिवसांत अमेरिकन इक्विटी बाजारात बिटकॉइनच्या किंमती वाढल्यामुळे सोन्या-चांदीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत असतात.

आज एमसीएक्स सोन्याच्या दररात 10 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आज सोन्याचा दर प्रति ग्रॅम 43 हजार 990 रुपये झाला आहे. काल सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती, त्यामुळे काल प्रति ग्रॅम सोन्याचा दर 4 हजार होता.

चांदीच्या दरात आज एमसीएक्सवर 700 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे प्रती किलो चांदीचा दर 65 हजार 300 रुपये आहे. काल चांदीच्या दरात 600 रुपयांची घट झाली होती. त्यामुळे काल प्रति किलो चांदीचा दर 66 हजार रुपये इतका होता.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याच्या बाबतीत लवकरंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जाऊ तशी सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ‘इतके’ दिवस लॉकडाऊन…

“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं…

“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं…

“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…