मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे सरकार स्थापन झालं असलं तरी आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण अद्यापही सुरूच आहे.
शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाराजीचा सूर आवळला आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरही शिंदे गट व संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
आमचा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंवर राग नाही म्हणत अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. तर आता राऊतांना नासक्या भाजीची उपमा देत शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. तर आम्ही बंडखोर नाही, शिवसेनेतच आहोत. पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाहीत, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
कोण माणूस शुक्राचार्य आहे ते सर्वांना माहिती. त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केला आणि तो पक्ष आम्ही वाचवतोय, असा अप्रत्यक्ष टोला देखील गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.
आमचा पक्ष वाढवण्यामागे आमचेच लोक कमी पडले. त्यामुळे आम्ही हा उठाव केल्याचं गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं. तर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंबद्दल आम्हाला आदर असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“कारवाई करायला काँग्रेस पक्षात माणसं तरी किती शिल्लक राहिली आहेत?”
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला झटका
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोाठी बातमी! शिंदे सरकारचा संजय राऊतांना पहिला दणका
“पवारसाहेब जागतिक नेते, मोठे नेते मग पवारांकडच जा, इथं कशाला अडकून पडलाय”