“गुजरात भाजप सरकार हार्दिक पटेल यांना मुद्दाम लक्ष्य करतंय”

अहमदाबाद | गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनात झळकलेला नेता हार्दिक पटेल गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्याची पत्नी किंजलने केला आहे. गुजरात पोलीस मुद्दाम हार्दिक यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला आहे.

हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांकडूनच आता हार्दिक कुठे आहेत, असा सवाल विचारला जात आहे. पोलिसांच्या या प्रश्नावरुन किंजल यांनी हार्दिक बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हार्दिक यांनी इतर कोणत्याही लोकांना भेटू नये असं गुजरात सरकारला वाटत आहे. त्यामुळे त्यांना अशी वागणूक देत असल्याचा आरोप किंजल यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल लढत आहेत. 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी आरक्षण रॅली काढली होती. या रॅलीमुळे गुजरातमध्ये हिंसाचार भडकला होता. यावेळी हार्दिकसह त्याच्या इतर सहकाऱ्यांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेशी अनेकांनी भाजपध्ये प्रवेश केला त्यामुळे आता त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होत नाही, असंही किंजल यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

-शिवरायांवरच्या टिकटाॅक वरील या व्हीडिओने सोशल मीडियावर घातला चांगलाच धुमाकूळ!

-अजित पवारांनी दिला मुंबईच्या डबेवाल्यांना सुखद धक्का; देणार…

-मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय चुकीचा; आघाडीत वादाच्या ठिणग्या