ख्रिसमस अगोदर सरकारचा मंत्रिमंडळविस्तार- हुसेन दलवाई

औरंगाबाद | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसत आहे. ख्रिसमसअगोदर म्हणजे 25 डिसेंबर अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळावरून महाविकासआघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

सरकार पडावं म्हणून कोणी पाण्यात देव बुडून बसले असतील, तर त्यांची निराशा होईल, असं म्हणत हुसेन दलवाई यांनी भाजपवर तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील, असं हुसेन दलवाई  यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-