भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

नवी दिल्ली | भारतात दोन प्रकारच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात भारतात या वटवाघळांमुळेच कोरोना विषाणू पसरला का असाही प्रश्न विचारला जात आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्चचे प्रमुख पद्मश्री रमण गंगाखडेकर यांनी उत्तर दिलं आहे.

भारतात वटवाघळामुळे कोरोना आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये वटवाघळमुळे कोरोना आला नाही किंवा पसरलाही नाही. भारतातील दोन प्रकारच्या वटवाघळांवर संशोधन करण्यात आले. या दोन्ही वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. मात्र तो माणसमध्ये संसर्गित होणारा नाही, असं रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे.

माणसामध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण पॅनगोलियन नावाच्या प्राण्यापासून झाल्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीला वटवाघळमुळे कोरोना होणार नाही, असं रमण गंगाखेडकर यांनी सांगितलंय.

चीनमधून उद्या रॅपिड टेस्ट किट येणार आहेत. या किटच्या वापराचा सर्विलन्सही होणार आहे, अशी माहिती रमण गंगाखेडकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

-“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारे आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..”

-केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही पैसे मिळेनात -बाळासाहेब थोरात

-“परदेशातून आलेल्या 30 ते 40 लाख लोकांची चाचणी तेंव्हाच केली असती तर…”

-मोदी सरकार नकारात्मक आहे; शाहिद आफ्रिदीचा निशाणा

-यंदा सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज