हैदराबाद | सध्या कोरोनाचं प्रचंड मोठं संकट भारतासमोर उभं आहे. अशा परिस्थितीत तबलिकीवरून भारतातल्या मुस्लिम समाजाच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. हैदराबादमध्ये ते बोलत होते.
मी मुस्लिम असल्याने मला तबलिकीवरून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. हिंदु्त्वाचे नाव घेऊन कधी अशा प्रकारे कुणाला निषेध व्यक्त करायला सांगितला का? असा प्रतिसवाल त्यांनी विचारला आहे.
तबलिकी जमातीचे कार्यक्रम यापूर्वीही होत होते परंतू त्यांना आताच बदनाम केले जात आहे. संसदेपासून अयोध्येत राम मूर्ती स्थापनेवेळी लोकांची गर्दी झाली होती. मात्र त्यावेळी सगळे का गप्प होते?, असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, बहुसंख्याकांचा दुटप्पीपणा वारंवार उघडा होत आहे. जर समान संधीच नाही तर समान भागीदारीसाठी विचारणं कसं योग्य आहे?, असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय
-डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’
-तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!
-अखेर मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं…
-मुख्यमंत्र्यांनंतर आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाजवळ आढळला कोरोनाचा रूग्ण