मुंबई | निवडणूक टाळणाऱ्या भाजपचा जनतेने पराभव केला. दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निकालानंतर व्यक्त केली.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्यालाच हादरा दिला आहे. यावरून जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडत भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. येथे काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे.
विदर्भात भाजपचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत. जिथे भाजपची चांगली पकड होती. त्याच नागपुरात भाजपचा पराभव झाला आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
धुळे जिल्हा परिषदेत भाजपचा दणदणीत विजय – https://t.co/pQdJU1VkgR @BJP4Maharashtra #ZPelectionresult
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
दीपिका पादुकोणच्या सिनेमाबाबात केंद्रीय मंत्र्याचा दावा – https://t.co/HU8c15Agy7 @deepikapadukone #JNUattack @PrakashJavdekar @BJP4Maharashtra #ChhapaakReview #Chappak
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
पालघरमध्ये भाजपला मोठा धक्का – https://t.co/QzSktPUXsM @BJP4Maharashtra @ShivSena @INCMaharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020