मुंबई | माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं असून कॅबिनेट विस्तारानंतर सर्व खात्याचे पुन्हा वाटप होईल, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. खातेवाटपात जयंत पाटील यांना अर्थ मंत्रालयासह इतर 8 खात्यांची जबाबदारी दिली आहे.
नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप महत्वाचं मानलं जात आहे. शपथविधी झाल्यानंतर गेले 15 दिवस सगळेच मंत्री बिनखात्याचे होते
खातेवाटपाबाबत जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं होतं. खातेवाटपावर मौन पाळून बसल्याने जयंत पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर येऊ लागल्या. मात्र जयंत पाटील यांनी ट्वीट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, गृह खात्यासाठी जयंत पाटील हे आग्रही असल्याचं बोललं जात होतं. पण गृहखातं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे ठेवलं आहे.
I think portfolio distribution announced today is of a temporary nature. Actual picture regarding portfolios will be clear before the people of Maharashtra after the cabinet exapansion. #MahaVikasAghadi
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 12, 2019
महत्वाच्या बातम्या-
‘सिल्व्हर ओक’वर ट्रीपल सेलिब्रेशन; पवार-ठाकरे कुटुंब एकत्र! – https://t.co/lSGGV6kyFW @ShivSena @PawarSpeaks @NCPspeaks @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 13, 2019
“हिंदू समाजाचे आम्ही एकमेव तारणहार आहोत हे सिद्ध करण्याच्या इर्षेतून CAB आणले” – https://t.co/HhXIGZheQP @ShivSena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 13, 2019
राज्याला आम्ही समृद्ध आणि भयमुक्त करण्याचा प्रयत्न करू- एकनाथ शिंदे – https://t.co/LuvJL97ZYx @mieknathshinde @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 13, 2019