“माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं”

मुंबई | माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं असून कॅबिनेट विस्तारानंतर सर्व खात्याचे पुन्हा वाटप होईल, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. खातेवाटपात जयंत पाटील यांना अर्थ मंत्रालयासह इतर 8 खात्यांची जबाबदारी दिली आहे.

नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप महत्वाचं मानलं जात आहे. शपथविधी झाल्यानंतर गेले 15 दिवस सगळेच मंत्री बिनखात्याचे होते

खातेवाटपाबाबत जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं होतं. खातेवाटपावर मौन पाळून बसल्याने जयंत पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर येऊ लागल्या. मात्र जयंत पाटील यांनी ट्वीट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, गृह खात्यासाठी जयंत पाटील हे आग्रही असल्याचं बोललं जात होतं. पण गृहखातं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे ठेवलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-