सोंगी-ढोंगी येतील पण भावीच राहतील- जयदत्त क्षीरसागर

बीड : निडणुकीच्या काळात मतासाठी कोणी पाया पडेल, अनेक सोंग घेऊन येतील पण असे भावी भावीच राहतील, असा खोचक टोला शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांना लगावला आहे. 

गळ्यात हात घालून मत मागणारे त्याच हाताने कधी गळा कापतील हे सांगता येत नाही, असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत. जयदत्त क्षीरसागरांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गहणिय बैठकीत विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. 

विकासाचं नातं मजबूत आणि दृढ करण्याची ही निवडणूक आहे, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत.

विजयासाठी वज्रमूठ आवळा, गावाकडे जा, धनुष्यबाण घराघरांत पोहचेल असं काम करा. गट तट बाजूला ठेवा, असं आवाहन जयदत्त क्षीरसागरांनी केलं आहे. शिवसेनेचा विजय निश्चत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जगदीश काळे, वैजीनाथ तांदळे, अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, नितीन दांडे, सखाराम मस्के, दिलीप आहेर हे बैठकीला उपस्थित होते. 

महत्वाच्या बातम्या-