पुणे | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुण्यातील सारस बागेच्या शेजारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी संविधानावरील हल्ला आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.
सीएए कायदा आणून केंद्र सरकार संविधानातील मुल्यांचा भंग केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे आंबेडकर स्वीकारायचे की गोळवळकर हे देशानं ठरवायचं आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, सीएए विरोधात बोलताना इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”
-जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!
-तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…
-“महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार”
-अभिमानास्पद…. जगप्रसिद्ध ‘आयबीएम’च्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी अरविंद कृष्णा!