मुंबई | शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी एकत्र येत हॉटेल ग्रँड हयात इथं मोठं शक्तीप्रदर्शन केलं. हा कार्यक्रम संपताच काही क्षणांत भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने आणि आशीर्वादाने वाजतगाजत होणारे हे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेला बेकायदेशीर विवाह नाही. तुम्ही बहुमत सिद्ध करायला घाबरून कोर्टात नुसते दिवस ढकलताय, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी शेलार यांना दिलं आहे.
महाआघाडीचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ओळखपरेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा हा त्यांचा टुकार प्रयत्न होता, असं म्हणत ‘आम्ही 162’ म्हणणाऱ्यांनी त्या सभागृहात 145 आमदार तरी होते का?, असा सवाल शेलार यांनी महाआघाडीला विचारला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर भाजप नेते आणि महाआघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट-
आशिष शेलार जी
हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय
लोकशाही शी खेळ करणार्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
“मी पुन्हा येईन, पुन्हा येईन…या या या आमच्या बोकांडी बसा” https://t.co/TwSzPNjdYY #Viral
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 25, 2019
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचे पडसाद दिल्लीत; युवक काँग्रेसचं संसद परिसरात आंदोलन https://t.co/XqBJRLIpMK #MaharastraPoliticalCrisis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 25, 2019
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5380 कोटींची मदत मुख्यमंत्री फडणवीसांनी केली जाहीर https://t.co/pzabv01fzQ @Dev_Fadnavis #Farmers
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 25, 2019