नवी दिल्ली | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क सोशल मीडियालाच रामराम करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्वत:च यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी काहीशा सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विरोधी पक्षांनी मात्र मोदींच्या निर्णयावर काडाडून प्रहार केले आहेत. मोदींच्या या निर्णयावर सीपीआय नेता कन्हैया कुमारने त्यांना खोचक टोला लगावला आहे.
देशाचा जीडीपी दर घसरायला लागला की लागले टीआरपी स्टंट करायला, असं ट्वीट करत त्याने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्वीट करताना ध्यान_भटकाकाओ_योजना असा हॅशटॅग कन्हैयाने वापरला आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींना सल्ला देणारं खोचक ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदीजी आपण सोशल मीडिया सोडू नका तर द्वेष सोडा, असा सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे. एका लाईनचं ट्वीट करून राहुल गांधींनी मोदींना सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मोदींच्या या ट्वीटवर जास्त काही बोलण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांच्या निर्णयावर आपण काही बोलण्यास आता योग्य वेळ नाही. रविवारी ते आपल्या सगळ्यांना जे काही सांगायचं आहे ते सांगतील, असं म्हटलं आहे. तर काही भाजप नेत्यांनी मोदींनी जर सोशल मीडिया सोडला तर आपण देखील सोशल मीडिया सोडू, असा पवित्रा घेतला आहे.
जीडीपी लगी गिरने तो टीआरपी स्टंट लगे बढ़ने!!#DhyaanBhatkaoYojna
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) March 2, 2020
मोदींनी सोशल मीडिया सोडण्यासंबंधी काय केलं होतं ट्वीट-
येत्या रविवारपासून मी माझी सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा विचार करतोय. यामध्ये माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबचा समावेश असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर राहुल गांधींचा खोचक टोला
-हा भाजप नेता म्हणतो, मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर मी देखील सोडेन!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल मीडियाला गुडबाय? मोदींची ट्वीट करून माहिती
-ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; भाजपच्या माजी आमदाराचा दावा
-मलाही संसार आहे लेकांनो… व्हीडिओ काढताना जरा विचार करा- इंदुरीकर महाराज